हा ब्लॉग शोधा

बुधवार, २२ जुलै, २०२०

Ranu Mondal (रानू मंडल)

आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो ज्यात रेल्वे स्टेशन वर  59 वर्षांची एक महिला गाणं गाते आहे "एक प्यार का नागम है मौजो की कहाणी है". आपण जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा तल्लीन होऊन ऐकत राहतो. मग आपण हे बघत नाही की त्याला कोणत्याही संगीताची साथ नाही, तिथे कसल्याही प्रकारचं स्टेज नाही,  समोर बसलेला प्रेक्षकवर्ग नाही. आपण फक्त ते गाणं ऐकतो. ऐवढा सुरेल आवाज. मग आपण शोधायला लागतो की ऐवढा सुरेल आवाज असणारी ही बाई कोण आहे ? स्टेशनवर का गाणं गाते आहे ? 
हळूहळू त्या बाई बद्दल बरीच माहिती आपल्या समोर यायला लागते.

रानु मंडल हे नाव अक्षरशः प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकाने त्यांचा रेल्वेस्टेशनवर  "एक प्यार का नागम है, मॊजो की कहाणी है" हे लता दीदींच गाणं गायलेला व्हिडीओ बघितला आहे. काही दिवसांत तो व्हिडीओ
प्रचंड प्रमाणात बघितला गेला.  Social media वर व्हायरल झाला. आणि त्या स्टार झाल्या. स्टार झाल्या आणि काहीतरी खटकलं. आणि त्या पुन्हा गायब झाल्या. 

कशी झाली या सगळ्या प्रवासाची सुरुवात?
तर...
पश्चिम बंगाल मधील राणाघाट रेल्वेस्टेशन वर रानु मंडल गाणी गायच्या. त्यांचा तो सुरेल आवाज ऐकायला लोक प्रवासाच्या धावपळीत सुद्धा क्षणभर थांबायचे. असंच एकदा अतींद्र चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने त्याच रेल्वे स्टेशनवर मंडल यांचा "एक प्यार का नागमा है मौजो की कहाणी है" हे लतादीदींच गाणं गातानाचा व्हिडीओ केला. आणि तो फेसबुकवर अपलोड केला. आणि बघता बघता तो व्हिडीओ व्हायरल झाला. करोडो लोकांनी तो व्हिडीओ बघितला. आणि त्या नंतर रानु मंडल यांचं आयुष्य बदललं. त्यांच्या आयुष्याने जोरदार वेग घेतला. आणि प्रसिद्धीचा प्रकाशझोत त्यांच्यावर पडला. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हे नाव परिचित झाले. मग हिमेश रेशमिया यांनी मंडल यांना बॉलिवूड मध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला. ते गाणं होत 
"तेरी ही मेरी ही तेरी मेरी तेरी मेरी ही कहाणी..."

 रानु मंडल स्टार झाल्या. त्या मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये दिसू लागल्या. लोकांना त्यांना बघायला आवडायला लागलं. लोकांना त्यांच्या सोबत सेल्फी घ्यावीशी वाटायला लागली. आणि इथेच माशी शिंकली. 
एका महिलेला सेल्फी द्यायला नकार दिला म्हणून रानु मंडल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या. आणि त्यांच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली. आज त्या प्रसिद्धी माध्यमातून गायब झाल्या. (कोणी म्हणतं हल्ली त्या  स्टेज शो करण्यात व्यस्त आहेत तर कोणी म्हणतं त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार केला जात आहे आणि त्याच त्यात काम करणार आहेत म्हणून त्या व्यस्त आहेत. पण हे मात्र नक्की की त्या social media मधून गायब आहेत). त्यांचा सुरेल आवाज लोकांना नकोसा वाटायला लागला. प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली अस लोकांना वाटायला लागलं. 

येथे हा प्रश्न उपस्थित होतो की मंडल यांनी अशी काय चुक केली, की त्यांना त्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागली ! 
सेल्फीला नाही म्हणाल्या म्हणून समाज त्यांच्यासोबत असा वागू शकतो का ? किंवा अस वागणं योग्य आहे का? हे आपण बघितलं पाहिजे. वास्तविक पाहता एखादी व्यक्ती जेंव्हा Celebrity होते तेंव्हा तीचं personal life हे बऱ्यापैकी Social झालेलं असतं.  Personal space फार कमी झालेली असते. प्रसिद्धीच्या बदल्यात आपलं personal life आणि  space गमावणे ही प्रत्येक celebrity च्या आयुष्याचा भाग होऊन जातं. कदाचित हेच रानु मंडल यांना समजलं नसावं. किंवा हे सगळं समजण्यासाठी त्यांना वेळ हवा होता पण त्यांच्या आयुष्यात हे सगळं एवढं झटपट झालं की त्यांना विचार करायला स्वतःवर काम करायला वेळच मिळाला नाही. 
यश मिळवणं हे अवघड आहेच पण त्या पेक्षा जास्त अवघड आहे ते टिकवणं. आणि नेमकं हेच अनेकांना जमत नाही. 

खरंतर रानु मंडल ने एका सेल्फीला नकार दिला म्हणून आपण रानु मंडल आणि त्यांच्या कलेला नकार देणे कितपत योग्य आहे ? असंही असू शकेल की त्यांना या प्रसिद्धीचा प्रचंड ताण आला असेल. रेल्वे स्टेशनवर कुठेतरी एका कोपऱ्यात बसून मोकळेपणाने गाणं गाणाऱ्या बाईला गर्दी मध्ये comfortable वाटत नसेल. सुरुवातीला त्यांना हे सगळं छान वाटलं असेल पण नंतर त्याचा त्रास होत असेल. किंवा हेच लोक प्रेम करतात आणि हेच लोक social media वर troll करतात हे त्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेरचं असेल. किंवा celebrity झाल्यावर समाजात वेगळं आणि personal life मध्ये वेगळं वागायचं असतं हे त्यांना तोपर्यंत माहीत झालेलं नसेल. मनुष्य म्हटल्यावर त्याच्या मानसिक अवस्थेचे वेगवेगळे पैलू असतात. कदाचित आपण ते समजून घ्यायला पाहिजे होतं का? त्यांच्या makeup केलेल्या एका photo ला मुद्दामहून Edit करून त्यावर त्यांना एवढ्या प्रमाणात troll केलं की त्या Makeup artist ला स्वतःहून original फोटो Social media वर पोस्ट करावा लागला आणि कोणीतरी मुद्दामहून हे करत आहे ते सांगावं लागलं. अशा प्रकारची trolling झालेली असताना कोणत्या नवख्या व्यक्तीला मानसिक ताण येणार नाही? नवखी आहे, रेल्वे स्टेशनवर गाणारी आहे तिचा बचाव करायला कोणी पुढे येणार नाही या गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना जास्तीत जास्त troll करण्यात आलं. हे मान्य आहे, की आपणच त्यांना Star केलं पण म्हणून त्याची ही किंमत वसूल करायची का ? एखाद्या व्यक्तीच्या कलेमुळे आपलं मनोरंजन होतं पण त्या व्यक्तीच्या व्यंगामुळे किंवा प्रतिमा मलिन करण्याने आपलं मनोरंजन होत असेल तर ही एक प्रकारची विकृती नाही का? 

मग रानु मंडल ह्या रेल्वेस्टेशनवरच बऱ्या होत्या असं वाटायला लागतं. किमान तिथे त्यांना क्षणभर का असेना मान होता. लोकांना कुतूहल वाटायचं. 

ज्यावेळेस मी आजही असंच एखाद्या नवीन कलाकाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ बघतो, तेंव्हा वाटत राहतं की, आपण जर असंच वागणार असू, सेल्फीला नाकारलं म्हणून आपण त्या व्यक्तीलाच नाकारणार असू, तर ती व्यक्ती आहे तिथेच बरी आहे. तिचा रानु मंडल नको व्हायला. 




४ टिप्पण्या:

Ranu Mondal (रानू मंडल)

आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो ज्यात रेल्वे स्टेशन वर  59 वर्षांची एक महिला गाणं गाते आहे "एक प्यार का नागम है मौजो की कहाणी है"....